(अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
१. तिरूवल्लुवरचा व्यवसाय कोणता होता ?
उत्तर. तिरूवल्लुवर घरी कापड विणायचे व आठवड्याच्या बाजारात विकायचे असा त्यांचा व्ययसाय होता.
२. तिरूवल्लुवरला राग यायला हवा, यासाठी सावकाराच्या मुलाने काय केले ?
उत्तर. तिरूवल्लुवरला राग यावा म्हणुन सावकाराच्या मुलाने माडून ठेवलेल्या कपड्यातील एक कपडा उचल्ला व टर्रकन फोडून त्याचे दोन तुकडे केले.
३. सावकाराचा मुलगा तिरूवल्लुवरावर का खवळला ?
उत्तर. सावकाराचा मुलगा तिरूवल्लुवरावर का खवळला कारण तिरूवल्लुवरने सर्व किंमत शांत व न राग येत दिली.
४. सावकाराच्या मुलाने तिरूवल्लुवरचे पाय का धरले ?
उत्तर. सावकाराच्या मुलाने तिरूवल्लुवरचे पाय धरले कारण तिरूवल्लुवरने सांगितलेली जीवनाची किंमत त्याला समजली व त्याला त्याची चूक कळली.
५. तिरूवल्लुवर कुठल्या गावचा होत ?
या
तिरूवल्लुवर कुठे राहत होता ?
उत्तर. तिरूवल्लुवर तामिळनाडूमधील एका गावात राहत होता.
६. सावकाराचा मुलगा कुणालाच का घाबरत नसे ?
उत्तर. पैशांची मस्ती आणि तारूण्याची रग यामुळे सावकाराचा मुलगा कुणालाच घाबरत नसे.
७. तिरूवल्लुवरच्या एक कपड्याची किंमत क्या होती ?
उत्तर. तिरूवल्लुवरच्या एक कपड्याची किंमत दोन रुपये होती.
८. ‘संत तिरूवल्लुवर’ हा पाठ कुणी लिहिला ?
उत्तर. ‘संत तिरुवल्लुवर’ हा पाठ चंद्रकांत गांवस यांनी लिहिले.
९. तिरूवल्लुवरने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
उत्तर. तिरुवल्लुवरने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव ‘तिरूक्कुरल’ आहे.
१०. तिरुवल्लुवरला जाऊन किती वर्षे झाली ?
उत्तर. तिरुवल्लुवरला जाऊन आज हजारो वर्ष झाली.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यांत लिहा.
१. तिररूवल्लुवरचा मते जीवनाच्या चिंध्या केव्हा होतात ?
उत्तर. तिरूवल्लुवरच्या मते जसं कपड्याचं, तसचं माणसाच्या जीवनाचं असते. जोपर्यंत कपडा आहे तोपर्यंत त्याला किंमत असते. क्रोध, अहंकार यासारख्या वाईट गुणामुळे माणसाच्या जीवनाच्या चिंध्या होतात.
२. सावकाराने तिरूवल्लुवरचे आभार का मानले ?
उत्तर. तिरूवल्लुवरचे बोलणे ऐकुन सावकाराचा मुलगा सुधारला. त्याने दुसऱ्याची खोडी काढायचे सोडून दिले. आपला मुलगा सुधारला म्हणून सावकाराला आनंद झाला, व त्याने तिरूवल्लुवरची भेट घेऊन त्याचे आभार मानले.
३. सावकार तिरूवल्लुवरला घेऊन कविपरिषेदेला का गेला ?
उत्तर. सावकार मुलासहित तिरूवल्लुवरच्या घरी काही दिवस राहिला. ते रोज तिरूवल्लुवरच्या ओव्या एकेत होता. त्यो ओव्या ऐकून सावकरला वाटले की, तिरूवल्लुवरच्या ओव्या हा मोठा खजिना आहे. तो सर्वांसमोर उघडा झाला पाहिजे. म्हणून सावकार तिरूवल्लुवरला घेऊन मदुरा येथे भरलेल्या कविपरिषदेला गेला.
४. तिरूवल्लुवरने कविपरिषद कशी जिंकली ?
उत्तर. कविपरिषेद पंडितांनी तिरूवल्लुवरला प्रश्न विचारला, “काव्यशास्त्र, ज्योतिष, तत्वज्ञान यापैकी तुमचा ग्रंथ कोणता विषयावर आहे ? ” त्याने एकेक ओवी वाचायला सुरूवात केली. सारी सभा ओत्या ऐकून चकित झाली. पंडित म्हणाले, “खरोखरच हा जीवनाचा महान काव्यग्रंथ आहे. “अशाप्रकारे तिरूवल्लुवरने कविपरिषद जिंकली.
५. तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या मुलाला तिरूवल्लुवरने काय समजावले ?
उत्तर. आपली चूक मानून तिरूवल्लुवरचे पाय धरल्यावर सावकाराच्या मुलाला तिरूवल्लुवर समजावत म्हणाला “माणसाने प्राणपणाने सांभाळावी अशी एकच वस्तू देवाने माणसाला दिली आहे. ती म्हणजे सदाचार. त्याची साथ माणसाने कधी सोडू नये.”
६. बाजारत लोकांची बरीच गर्दी का होती ?
उत्तर. आठवड्याचा बाजार असल्याने बाजारात लोकांची बरीच गर्दी होती. कोणी काही विकण्यासाठी आला होता तर कोणी काही विकत घेण्यासाठी आला होता. तसेच तिकडे तरुणांची एक घोळके मात्र उगीचच बाजारात फिरत होते.
७. सावकार का प्रभावित झाला ?
उत्तर. ज्याने माझ्या मुलाला सुधारले त्या देवमाणसाचे आभार मानले पाहिजेत असे सावकाराला वाटले, म्हणून एक दिवस सावकार तिरूवल्लुवरला भेटण्यासाठी मुलाला घेऊन त्याच्या घरी गेला. हातामागावर कापड विणत तिरूवल्लुवर गोड आवाजात ओव्या म्हणत होता. त्याचा ओव्या ऐकून सावकार प्रभावित झाला.
८. कविपरिषद कशाप्रकारे मांडली जायची ?
उत्तर. कविपरिषद पांड्या राजे भरवत असत. तेथे कवी आपापले काव्यसंग्रह वाचत. कविपरिषदेतील पंडित काव्यग्रंथाचा कस ठरवीत; त्याप्रमाणे राजा कवीचा यथायोग्य सन्मान करी. अशाप्रकारे कविपरिषद मांडली जायची.
९. तिरूवल्लुवरचा ग्रंथ कोण कोणत्या भाषांत भाषांतर झाला आहेत?
उत्तर. तिरूवल्लुवरचा ग्रंथ संस्कृत, तेलगू, मल्याळी, मराठी, उर्दू इत्यादी भारतीय भाषांत आणि इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन , सिंहली आदी विदेशी भाषांत भाषांतर झाला आहेत.
व्यवसाय :
(अ) खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिहा.
१. “या माणसाला कधीच राग येत नाही.”
उत्तर. टोळकेतल्या एकजण्याने सावकाराच्या मुलाला म्हटले.
२. “याची काय किंमत ?”
उत्तर. सावकाराच्या मुलाने तिरूवल्लुवरला विचारले.
३. “का नाही ?”
उत्तर. सावकाराच्या मुलाने तिरूवल्लुवरला विचारले.
४. “याची किंमत काहीही नाही. ”
उत्तर. तिरूवल्लुवरने सावकाराच्या मुलाला म्हटले.
५. “माझी चूक झाली. ”
उत्तर. सावकाराच्या मुलाने तिरूवल्लुवरला म्हटले.
६. “तुमचामुळे माझा मुलगा सुधारला.”
उत्तर. सावकाराने तिरूवल्लुवरला म्हटले.
७. “काव्यशास्त्र, ज्योतिष्य, तत्वज्ञान यापैकी तुमचा ग्रंथ कोणत्या विष्यावर आहे ?”
उत्तर. कविपरिषदेच्या पंडितांनी तिरुवल्लुवरला विचारले.
८. “खरोखरच हा जीवनाचा महान काव्यग्रंथ आहे.”
उत्तर. पंडितांनी सारा सेभला म्हटले.
(ब) रिकाम्या जागी पठातील योग शब्द लिहा.
१. एकदा असाच _______ बाजार भरला होता.
२. तिरूवल्लुवरही कापड विकण्यासाठी ________ आला होता.
३. बाजारात लोकांची बरीच ________ होती.
४. त्यांच्यामध्ये _______ एक मुलगा होता.
५. फिरत फिरत ते टोळके _______ पोहोचले.
६. त्याचा आवाजात किंचितही ______ नव्हता.
७. आता मात्र सावकाराच्या मुलगा _______.
८. त्याचे ते ________ शब्द एकून सावकाराच्या मुलाचा ________ उतरला.
९. ठरल्यानुसार _______ सूरुवात झाली.
१०. एकेका कवीने आपापला _______ वाचून दाखविला.
उत्तर (१) आठवड्याचा
(२) बाजारत
(३) गर्दी
(४) सावकाराचाही
(५) तिरुवल्लुवरकडे
(६) राग
(७) खवळला
(८) मधाळ, पारा
(९) कविपषिदेला
(१०) काव्यग्रंथ
भाषाभ्यास :
सामान्यनामे ( Common noun ) – गाव, माणूस, झाड, पर्वत, कपडे, खेळणी इत्यादी हे समान्यनामे आहेत.
विशेषनामे ( Proper noun ) – गोविंद, मदुरा, सह्याद्री, गंगा इत्यादी हे विशेषनाम आहेत.
भाववाचक नामे (Abstract noun ) – स्वच्छाता, स्वातंत्र्य, सौंदर्य इत्यादी हे भावाचक नामे आहेत.
(अ) खालील शब्दांचे नामांच्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करा.
(१) पर्वत, रस्ता, भलाई, गावकी, उकडा, पोत्कपणा, आडदांडपणा, छप्पर, शान, आषाढ, घर, सूर्य, मुंबई, पुस्तक, कोल्हापूर.
सामान्यनामे – पर्वत, रस्ता, छप्पर, घर, पुस्तक
विशषेनामे – शान, आषाढ, सूर्य, मुंबई, कोल्हापूर
भाववाचक नामे – भलाई, गावकी, उकडा, पोत्कपणा, आडदांडपणा
(ब) पुढे दिलेल्या शब्दांपासून भाववाचक नामे बनवा.
खोटा – खोटेपण
महाग – म्हारगाय
बाल – बालपण
विचित्र – विचित्रपणा
नम्र – नम्रता
लहान – लहानपणा
गोल – गोलाकार
तरुण – तरुणपण
म्हातारा – म्हातारपण